Monday, June 5, 2017

जेवढ्यास तेव्हढे


ज्याला असतो कधी अर्थ
त्याचा होतो जेव्हा अनर्थ
तेव्हा वाटते ते सारे 
कसे होते व्यर्थ व्यर्थ

सर्वास नसतो कधी अर्थ
सर्वच नसते कधी पूर्त
पदरात पडलेले असते
जेवढ्यास तेव्हढे सार्थ

सुरेश नायर
५ जून, २०१७

No comments:

Post a Comment

पुन्हा एकदा

  कधी वाटते पुन्हा एकदा, मागे जाऊन प्रेम करावे आंधळ्याने अनुभवले जे, डोळसपणे पुन्हा करावे विशीतल्या त्या प्रेमामध्ये, धुंदी, कैफ, नशा होती स...