Saturday, July 29, 2017

कविता

शेवटी कविताच ती, सुचली तर सुचली
नाहीतर रुसून, कोपऱ्यात बसली

कितीही मनावले, अन केली विनवणी
हटून बसते बापडी, देत हुलकावणी

मग सहज नकळत, कधी येते सामोरी
आपण मात्र धरावी, तोवर थोडी सबुरी

कारण असतेच ती, फुलपाखरासारखी
स्वैर भटकणारी, जणू एक शब्दपरी

येते तेव्हा देऊन जाते, सुंदरसे नजराणे
गजल, रुबाई, अभंग, ओवी, कधी केवळ गाणे

सुरेश नायर
२ जुलै , २०१७

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...