Showing posts with label मनोगत. Show all posts
Showing posts with label मनोगत. Show all posts

Saturday, May 4, 2024

Grief, Guilt and Relief – A Caregiver Dilemma

 

Hearing someone close to you being terminally ill is not an easy thing to digest. Even if it is your older parent who we know, on average, are closer to mortality than our younger selves. But especially because they are the ones who have been, in most cases, the stronger support pillars in our lives, it is harder to digest the fact that those pillars are now crumbling.

For all my life I had seen my mother (Aai) as a super energetic person. Whether it was cooking or any other work, the speed and efficiency of her work was always on high fuel. At one time she did home catering and while it was lot of demanding work she never got tired of it, doing it not because of any material need but just to keep herself engaged and busy in doing what she absolutely loved.

Since 2011 Aai had been staying with me here in US. In late 2022 she was diagnosed with CMML (Chronic Myelomonocytic Leukemia) which is a rare version of leukemia. The diagnosis led to series of treatment plans over 18-20 months which included medications, infusion chemo, radiation chemo, oral chemo medications but most importantly monthly blood transfusions due to significant drop in her hemoglobin levels. Each treatment caused severe weakness, fatigue,  nausea, discomfort due to increased spleen size and the transfusions required frequent ER admits which are tiresome. One of the hardest parts was blood draws, which seemed countless. As the condition progressed causing her to lose weight, loss of muscles and the skin becoming flabby, it became harder to find proper veins for blood draws, sometimes requiring multiple pokes in various places and bruising. 

Educating yourself as a patient or caregiver about the condition helps understand symptoms, treatment options with its pros and cons, progression of the disease and in general what to expect. A private FB CMML group with many patients and/or caregivers was very helpful in learning, sharing and openly talking about it all.

As a primary caregiver you live though your own version of the disease/ condition. In our case it was more so, since due to language and transportation reason, I had to be present for every Dr/hospital appt and answer any questions or provide info (Ninad, my nephew took her a few times when I was out of town). As a caregiver you don't just see what your loved one must go through all these treatments but are constantly watching them deteriorate physically and mentally while you are mostly helpless in making it all go away. There is also the juggling with other things in your own life - children, work, housework, social engagements. In fact, all aspects of your life are impacted. And while doing this you have to keep a strong demeanor and will to ensure you are doing the right things, whether it is talking with the doctors, nurses or supporting rest of your family deal with it.

While relatives and friends did offer help it was difficult to utilize it, especially for medical visits, as I knew the medical history, medications, symptoms etc. of what was going on while speaking with various medical staff. Hence it wasn't easy to substitute anyone. Thankfully I was able to take couple of vacation breaks with help from my nephew, niece & daughter who took care of Aai when I was away, but it always required careful planning. 

While all this is going on it's easy to go through a series of emotions such as frustration, anger, helplessness, burden, grief, and guilt. There were times when I got frustrated or angry with Aai due to some conflicting demands during my work meetings or something not up to her expectation only to feel guilty about it later. There's also the fact that people who are fiercely independent in life are the worst patients when it comes to sickness related dependency. 

As things got worse I also wished that things end sooner than later so that the suffering is not prolonged. I informed and advised her that the choice for continual treatment is hers to make and she can decide to opt out at any time. Neither the doctors, I nor anyone else can make the decision for her. Explained her about palliative care and hospice option. These are not easy things to discuss and while doing so there was always a feeling of guilt in my mind, thinking whether I was telling this for her own best interest (in this case less trauma and suffering) or a relief for myself from the work and stress of caregiving. This is a terrible dilemma for caregivers as it puts one in a confusing state of mind, making it harder to express your feelings to anyone. 

During the last visit with the Oncologist on Apr 15th we made decision to stop any active cancer treatment and switch for home hospice care. When the Dr said 'you did an excellent job of taking care of her. She wouldn't have come this far without your support' it was sort of a relief for me. Based on history and frequency of blood transfusions the Dr had surmised she may survive 6-8 weeks. However, she expired on Apr 24, just about a week from making the hospice choice.

While I have a very rational view on subjects of mortality, quality of life, death with dignity etc. Aai was always heavily invested in being the Matriarch of our family. I had long conversations with her about detachments, letting go of things, stop worrying about any of us, but I know it wasn't easy for her. Ultimately though, based on how quickly everything happened, I could only surmise that our decision did not matter much. The decision was already made by fate, destiny or whatever you may call it. The only solace to mind is that she got enough time to bid farewell to everyone in her birthplace in Kerala, in Pune and here in Detroit and in her last moments she was at home surrounded by her loved ones.

Finally, my only word of advice to any caregivers is that do what you can and need to do for your loved ones. Each situation may be different, you may be close or far away, alone or with lot of help. Just do your best. At the same time take time for yourself, don’t hesitate to seek out for help, share what you are going through with relatives, friends and at workplace. And understand that going through a roller coaster of emotions is perfectly normal. Just take it one day at a time. 

Suresh

5/3/2024

Friday, December 1, 2023

फुले वेचिता

माझ्या ब्लॉगचे नाव मी "सुरांगण" ठेवले यात फारशी कल्पकता होती असे नव्हे. मला 'मुक्तांगण' हा शब्द आवडतो तोच उसना घेऊन मी माझ्या नावाला जोडलं इतकेच. पण त्याखाली मी "अंगणात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुले वेचायला येशील इकडे" ही ओळ टाकली. तीही उसनीच " घाल घाल पिंगा वाऱ्या" या गीतातील पण दोन तीन शब्दांची फेरफार करून ब्लॉगच्या नावाशी त्याची जुळणी केली. एकूण विचार हा की हा ब्लॉग हे संपूर्ण आंतरजालातील (internet) माझे हक्काचे असे अंगण आहे, माझे लिखाण परिजातकांच्या फुलांसारखे आहे आणि ती फुले वेचायला कुणी कधी येईल याची मी वाट पाहतोय. 

एका अर्थाने पहायला गेले तर कीव यावी असा हा भिकार विचार वाटतो. एखादी गोष्ट विकायचा बाजार मांडून विक्रेत्याने लोकांचे लक्ष वेधून घ्यावे तसे काहीसे. पण खरे सांगायचे तर प्रत्येक निर्मात्याला/ कलाकाराला आपली निर्मिती/ कला इतरांपर्यंत पोहोचावी असे वाटणे स्वाभाविक आहे. मग तो एखाद कुणी प्रतिभावंत असो की अगदी सुमार कुणीसा असो (शेवटी ते ठरवायला देखील कुणी पाहणारे/ अनुभवणारे असायला हवेतच!).

माझे जे काही थोडे थोडके लिखाण (बऱ्याचश्या कविता व गीते, काही लेख, एक दोन कथा, प्रवासवर्णन) आहे ते फार उच्च प्रतीचे आहे असा माझा अजिबात भ्रम नाही. किंबहुना बहुतांश सुमारच असावे (अर्थात 'अंधों मे काना राजा' तसे कशाशी तुलना हेही महत्वाचे). पण काही मोजक्या कविता नक्कीच अश्या आहेत ज्याला दर्जा आहे, depth आहे.

असे हे लिखाण ब्लॉगवर टाकल्यावर कुणी वाचते का, वाचले तर प्रतिक्रिया काय हे कळायला मार्ग नसतो. एखाद कुणीतरी कधी एक दोन वाक्याची कमेंट टाकून जातो. तेवढ्यात समाधान मानून घ्यायचे. अश्यावेळी अपेक्षा असते आपल्या जवळचे लोक तरी वाचक आणि समीक्षक ठरतील. पण इथेही काहीसा अपेक्षाभंगच होतो.

मी बऱ्याच वर्षांपासून माझे काही समछंदी स्नेही आहेत त्यांच्याबरोबर जुळवून आणलेल्या एका बुक - कलब चा सदस्य आहे. त्यातील सर्वांना मी कविता करतो व माझ्या ब्लॉगबद्दल ठाऊक आहे. कधी प्रसंगी मी वाचून दाखवलेली किंवा फेसबुक वर  व इतरत्र शेयर केलेली कविता वाहवा देखिल मिळवून जाते. 

बहुतेक वाचन इंग्रजी पुस्तकांचे असले तरी दरसाली दिवाळीच्या सुमारास आम्ही मराठी वाचायला निवडतो. यंदा मराठी कविता हा विषय निवडला. बहुतेकांचा शाळेनंतर कवितेशी संबंध तुटलेला. पण बरीचशी चित्रगीते, भावगीते, अभंग, गजल हे प्रकारही काव्य या सदरात मोडतात. त्यामुळे या ना त्या निमित्ताने कवितेशी आपले जुळते असतेच. मग काहींनी शाळेतल्या कविता शोधल्या, कुणी ओळखीची गाणी निवडली तर कुणी कुठल्या तरी अपरिचित कवींच्या कविता ऐकवल्या. 

मला खंत या गोष्टीची वाटली की एकाला सुद्धा माझी एखादी कविता निवडावी असे वाटले नाही. एकाने मला backup म्हणून ठेवले होते इतकेच काय ते समाधान. स्वतः मी ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' हा अभंग आणि कोविड लॉकडाऊनच्या वेळी तो अभंग मी कसा अनुभवला हे ऐकवले. शिवाय मुद्दाम माझी एक 'नाव' ही कविता ऐकवली. त्या कवितेचा मतितार्थ हा की नावाला लोक ओळखतात, जास्त महत्त्व देतात. पण कुणाला त्याचा काही संदर्भ लागला का नाही माहित नाही.

नंतर विचार आला की उगाच नाही 'घरकी मुर्गी दाल बराबर' असे म्हणतात. मीही त्याला अपवाद नसेन. आरती प्रभू सारखा अतिशय प्रतिभावंत कवी सुद्धा "ही निकामी आढयता का, दाद द्या अन शुद्ध व्हा, सुर आम्ही चोरतो का, चोरता का वाहवा" असे लिहितो. मग यावर मी राग मानावा का? मुळीच नाही. माझ्याच एका कवितेतल्या ओळी

"आपलेच दात आपलेच ओठ
घेती आपला आपणच चावा
ओघळणारे रक्तही आपलेच
मग राग कुणावर यावा?"

(चावा, रक्त कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण उपेक्षा ही प्रत्यक्ष जखमेपेक्षा जिव्हारी लागते)

मग प्रश्न येतो की आपण निर्मिती करावी कशाला? सरळ उत्तर म्हणजे त्यात स्वनिर्मितीचा स्वानंद आहे. म्हणून आपण आपलेच श्रोता व्हावे, आपलेच वाचक व्हावे, आपलेच रसिक व्हावे. जंगलात एकटा असला तरी मोर नाचतोच ना?
कधीतरी, कुणीतरी एखादा वाटसरू येऊन अंगणातील फुले वेचून जाईल. तेव्हा मी असेन, किंवा नसेनही.....

"धुंद वाटेवरी पेरीत जावे तराणे
जाता विरूनी खुणा पावलांच्या
मागे उरावे गाणे"

सुरेश नायर
१२ डिसेंबर २०२३

Sunday, January 2, 2022

हे सुंदर जग मी पाहून जाईन




तुमचे छंद (hobbies) कोणते असा प्रश्न विचारला तर बहुतेकांच्या यादीतील पहिल्या तीन क्रमांकात प्रवास (travel) हे असतंच. मग ते फेसबुक असो की एखाद्या डेटिंग साईटचं प्रोफाइल असो. आजवर आयुष्यात तुम्ही केलेला प्रवास म्हणजे लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान एवढंच असो की अमेरिकेतल्या मिडवेस्टकरने पाहिलेला नायगारा असो. आवडीचा छंद - प्रवास! 

मीही काही याला अपवाद नाही. अगदी लहानपणी  शिवापूर, बनेश्वर, कात्रज प्राणीसंग्रहालय अश्या शाळेच्या सहली व्हायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत केरळला आजोळी (आणि मामाच्या गावाला) आगगाडीने लांबचा (एकमार्गी 40 तास) प्रवास व्हायचा. शाळेत वरच्या इयत्तेत गेल्यावर बंगळूर-मैसूर व देहली-आग्रा-हरिद्वार-ऋषिकेश अश्या मोठ्या सहली झाल्या. 

कॉलेजमध्ये असताना पंख फुटले आणि आली लहर केला कहर असे म्हणत खूपसे outing झाले. आपापल्या दुचाकी काढून मित्रांसोबत सिंहगड नाहीतर अलिबाग-किहीम-अक्षी समुद्रकिनारा इथे कित्येकदा गेलो. शिवाय रायगड, प्रतापगड, हरिश्चंद्रगड, वासोटा, ढाक-बहिरी असे ट्रेक्स झाले. एक लक्षात रहावी अशी कोकण (दाभोली, चिपळूण, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, गणपती पुळे) ट्रिप मित्रांसोबत झाली. इंजिनियरिंगच्या चार वर्षात मित्रांसोबत गोव्याला जायचे सारखे बेत व्हायचे ते शेवटी एकदा चार वर्षानंतर जमून आले आणि नंतर नोकरीनिमित्त संपूर्ण गोवा अनेकदा पालथा घातला. 

या सर्व भांडवलावर, प्रवास माझा छंद आहे, ही माझी भावना कधीतरी मनामध्ये दृढ झाली. अमेरिकेत स्थलांतर झाल्यावर स्थिरावयाला थोडा वेळ लागला. मग काम, संसार, मुले यामध्ये व्यस्त झालो तरी प्रवास झाला नाही असे नाही. नायगारा (हो तोच तो!), डिस्नेवर्ल्ड, स्मोकी माउंटन्स, न्यू यॉर्क झालंच तर कॅनडा येथील टोरोंटो, मॉन्ट्रियल, क्युबेक वगैरे झालंच. कॅम्पिंग हा प्रकारही आवडीने स्वीकारला. 

अश्यात यावर्षी पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेकलो. हे वय असे की आयुष्याच्या वजाबाकीला सुरवात होते (फक्त माधुरी दिक्षितनेच पन्नाशीत बकेट लिस्ट का बरं करावी). शिवाय गेल्या वर्षातील काही जवळच्या अनुभवानंतर आयुष्य किती क्षणिक असू शकते याची प्रखरतेने जाणीव झाली आणि "Seize the moment" याचे महत्व जाणवले. म्हणून सहज मी एक Excel sheet काढून आपण आजवर किती देश, राज्ये, प्रांत पाहिले याची नोंदणी केली. आणि गेल्या 22-23 वर्षात आपण पाव अमेरिका सुद्धा नीटसा पहिला नाही हे पाहून मला माझ्या 'प्रवास' छंदावर कीव करावीशी वाटली. प्रवास कधी आणि कुठे करायचा हे खूपश्या गोष्टी जुळून येण्यावर अवलंभून असते. सर्वांच्या सुट्ट्या, खाणे-पिणे-देखावे याच्या आवडी निवडी, चालण्याची व चढण्या-उतरण्याची क्षमता आणि त्यावर खिशाला भार. या सगळ्या गोष्टी विचारात घेताना आपलं खूप काही पहायचं राहून गेलं/ जाईल याची मला खंत वाटू  लागली. 

मग मनाचा ठिय्या केला की यापुढे आपण कुठला योग जुळून यायची वाट पहायची नाही, स्वतः गोष्टी जुळवून आणायच्या. मग इतर कुणाला जमत नव्हते म्हणून एकटाच व्हर्जिनियाला चार-पाच दिवसांची ट्रिप केली. शेनंडोह नॅशनल पार्क, न्यू गोर्ज नॅशनल पार्क आणि असे इतर काही निसर्गरम्य परिसर पाहिले, hiking, whitewater rafting याचा मनमुराद आनंद घेतला. लांबचा एकला ड्राईव्ह आजूबाजूचा रम्य परिसर पहात आणि Audible वर एक सुंदर कादंबरी ऐकून अगदी मजेदार झाला. ओळखीचे सोबत नसतील तर अनोळखी लोकांशी ओळख पटकन होते, मग ती ओझरती का असेना हे जाणवलं. तसंच South Dakota बद्दल माहिती काढून ट्रिप प्लॅन केली. इथे मात्र चार मित्र जमले आणि तिकडचा सर्व रम्य परिसर मनमुराद हिंडलो. नुकतीच Arizona आणि Utah इथे जाऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आणि मनमुराद भटकंती करून आलो. 

आता माझी एक बकेट लिस्ट तयार आहे. निदान ज्या देशात आपण रहातो त्यातली सगळी राज्ये पहायची. निसर्गाची आवड आणि अमेरिकेतले National Parks याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. जमलंच तर परदेशी सुद्धा जमेल तितकं जाऊन यायचं. असेल तर सोबत, नाहीतर एकटंच भटकायचं . जगात पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप आहे. प्रांत बदलला की निसर्ग, संस्कृती, खाद्यपदार्थ असं खूप खूप काही बदलतं. आयुष्यात त्यातलं जितकं समावून घेता येईल तेवढं घ्यायचं. 

पुलंचे एक भाषण आहे "हे जग मी सुंदर करून जाईन' ज्यात ते केशवसुतांच्या ओळींचा संदर्भ देत कलानिर्मिती बद्दल बोलतात - "प्राप्तकाल हा विशाल भुधर, सुंदर लेणी तयात खोदा". खरंतर प्रत्येकाला काही लेणी खोदण्याइतका वेळ किंवा तितकी कलात्मकता असेल असे नाही. पण ह्या जगात जे आधीपासून सुंदर आहे ते पहायला, अनुभवायला सर्वानाच जमू शकते. ते सर्व पहायला म्हणून एक जन्म खरंतर कमीच आहे. म्ह्णून मी म्हणेन "प्राप्तकाली या विशाल भूधरी, जे जे सुंदर, ते ते शोधा" 

सुरेश नायर

Dec 2021

Sunday, November 8, 2020

पपा

 




साधारण चार वर्षांपूर्वी मी जैचई बद्दल लिहिलं तेव्हा पपांबद्दल देखील लिहीन असं ठरवलं होतं. पण राहूनच गेलं. ३-४ महिन्यांपूर्वी आमच्या बुक क्लब मध्ये आम्ही "A Man Called Ove" हे पुस्तक वाचलं आणि पपांची आठवण झाली पण पुन्हा राहून गेलं. मग अगदी परवा परवाच "भाई-व्यक्ती कि वल्ली" हा पुलंवर चित्रपट पाहिला आणि पुलं, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे शिवाय फर्ग्युसन कॉलेज, प्रयाग हॉस्पिटल पाहून पुन्हा आठवण झाली आणि आता लिहावेच असे ठरवले.

हे वाचण्याआधी ज्यांनी जैचई बद्दल वाचलं नसेल ते आधी वाचावं म्हणजे काही संदर्भ लागतील जैचई

पपा म्हणजे दिलीप जोशी. पण त्यांच्या कुटुंबातले आणि आमच्या वाड्यातले सगळेच लोक त्यांना पपा म्हणूनच संबोधायचे. साधारण १९१९ सालचा त्यांचा जन्म असावा. ऐशींच्या दशकात कधीतरी त्याची एकषष्टी झाली होती. मला जितक्या आधीचं आठवतंय तेव्हापासून मी त्यांना रिटायर असलेलंच पाहिलंय. विचारायचं फारसं कारण नव्हतं पण माझ्या मते शिक्षण खात्याशी त्यांच्या नोकरीचा संबंध होता. सेवादलातही बहुतेक काम केलं होतं. एकदा इंग्लंडला देखील जाऊन आले होते.

जैचई जर निरागस, बालमनाची तर त्याहून पपा एकदम तटस्थ आणि शिस्थखोर स्वभावाचे. घरातल्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, सर्वकाही रीतसर आणि नीटनेटकं ठेवावं याकडे कल. वाचनाची खूप आवड. शास्त्रीय संगीताची आवड. त्यांना आठवले कि काही गोष्टी चटकन डोळ्यासमोरून जातात. एका लांबश्या आरामखुर्चीत पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असलेले पपा, गॅलरीत येरझाऱ्या घालणारे पपा, बुकमार्क म्हणून वापरायला जाडसर कागदाची कात्रणं करणारे पपा, त्यांच्या खास गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे अप्पा पटवर्धन नावाच्या मित्राशी गप्पा मारत असलेले पपा

माझ्या बहिणीशी जसं जैचईशी अधिक सूत होतं तसं माझं पप्पांशी. आपल्या इथे शारंगपाणी पुस्तकप्रेमी आहेत, तसे पपा होते. त्यांच्याकडे लहानसा पुस्तकांचा साठा देखील होता. माझी वाचनाची आवड त्यांच्या घरीच रुजली आणि जोपासली गेली. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचं सभासद व्हायला waiting list असायची पण पपांनी त्यांचा ओळखीवर कि प्रिव्हिलेजवर मला membership मिळवून दिली. रविवारच्या वर्तमानपत्रातल्या कोड्या मधला एखादा राहिलेला शब्द मी सोडविला कि एकदम "वा बरोबर " असे काहीसे म्हणायचे. माझी पहिली कविता कॉलेजच्या मासिकात छापून आली ती मी त्यांना दाखवली तेव्हा अशीच शाबासकी दिलेली. पं. भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांचं गायन रेडिओ किंवा टीव्ही वर असेल तर लक्ष देऊन ऐकायचे आणि दाद द्यायचे. मी लहान होतो त्यामुळे कळायचं/ आवडायचं नाही पण कुठेतरी बीज रुजत होतं.

जैचईच्या आजारपणाचा आणि मृत्यूचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. अंतू बरवा मध्ये अंतूशेठ एकदा त्यांच्या पत्नीबद्दल सांगताना म्हणतात " ही गेली आणि दारचा हापूस तेव्हापासून मोहोरला नाही " तसं काहीसं पपाचं झालं असावं. हे सर्व मला त्यावेळी उमगलं नव्हतं पण मागे जाऊन पाहताना एक दोन प्रसंग आठवतात आणि याची जाणीव होते. दिवसभर मुले कामानिमित्त घराबाहेर असायचे तेव्हा घरात एकटेपण हे सुद्धा असेल. मी फर्ग्युसनला कॉलेजात असताना किंवा नंतरही अनेक वेळा अधून मधून दुपारी त्यांच्या घरी जाऊन वाचत वगैरे बसायचो. आमच्यात  खूप संवाद व्हायचा असे नाही पण निदान सोबत असायची.

१९९८ ला मी अमेरिकेत आलो त्यानंतर एक दोनदा पुन्हा पुण्याला गेलो. दरवेळी त्यांची तब्येत बऱ्यापैकी  खालावलेलीच होती. एका भेटीत मी गेलो तेव्हा ते पलंगावर पहुडले होते. शरीर आणि स्मरणशक्ती दोन्ही क्षीण झालेलं. मला नीटसं ओळखलं कि नाही कळत नव्हतं. मला अनावर झाले आणि त्यांचा हात हातात घेऊ मी तसाच अश्रू गाळत बसलो. परत  आल्यानंतर काही दिवसातच बातमी आली कि पपा गेले.

मी हे सर्व का लिहितोय? वयाची पन्नाशी जवळ आली, आयुष्याची उतरण सुरु झाली, एकेक पान लागले गळावया व्हायला लागले, कि मागे वळून पहाणं आलं. विशेषतः आपल्यावर ज्यांचा विशेष प्रभाव असतो, संस्कार असतात, जिव्हाळा असतो त्यांच्याबद्दल. किंवा कदाचित आरती प्रभूंच्या ओळींसारखं काहीसं असावं "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने". पपांच्या आता माझ्याकडे आहेत त्या आठवणी आणि माझ्याकडे राहून गेलेलं त्यांचं एक पुस्तक, माझ्याहून अधिक वयाचं, पिवळसर पाने सुटी सुटी झालेलं आणि त्यांची स्वाक्षरी असलेलं. आणि आहेत काही सवयी, नीटनेटकेपणाची, कात्रणांची बुकमार्क्स करण्याची, पुस्तकांवर तारीख घालून स्वाक्षरी करण्याची....

सुरेश नायर

नोव्हेंबर  २०२०

Sunday, April 12, 2020

एकांताचा वास

(A lockdown interpretation of Sant Tukaram's famous abhang. He felt trapped in to the worldly things, we feel trapped out. Both call for an introspection)

Spring ची चाहूल लागलीये. झाडांना नवीन पालवी फुटू लागली आहे. गवताची हिरवाळी दिवसेंदिवस वाढतेय. हवेत गारठा असला तरी जेव्हा ऊन असतं तेव्हा छान वाटतं. Patio वर, किंवा बाहेर चालायला गेलं की पक्षांची सुंदर किलबिलाट ऐकू येते.

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती

सध्या घरीच मुक्काम आहे. कुणाशी गाठभेट नाही. कामसुद्धा घरूनच असतं. सुरवातीला अवघड गेलं. ऑफिस मधील water cooler chats, मित्रांसोबत पार्ट्या व इतर social engagements याची सवय झालेली. आपल्याशिवाय दुसऱ्याचं पान हलत नाही किंवा दुसऱ्याशिवाय आपलं ही समजूत हळूहळू विरतेय. एकलेपणातसुद्धा करण्यासारखं खुप काही आहे, in fact आपण असा एकांत मिळत नाही याची असून मधून तक्रार करायचो याची जाणीव होतेय. मग नुसतं acceptance नाही तर या एकांताचं सुख जाणवू लागलंय

येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत

नशिबानं घर आहे, डोक्यावर छत आहे. घरात सर्व सोयी आहेत. इंटरनेट व electonic उपकरणं आहेत. करमणुकी साठी खुप काही आहे. वेळ पुरणार नाही इतके TV वर कार्यक्रम आहेत. लायब्ररी बंद असली तरी ऑनलाईन खूप पुस्तके आहे. अधून मधून FB, WhatApp असतंच. व्यायाम, योगा, meditation याचा शरीर आणि मनाची अवस्था सांभाळायला उपयोग होतोय

आकाशमंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी
कंथा कमंडलू देह उपचारा
जाणवितो वारा अवसरू

प्रसंग अवघड असला की आपल्यातल्या अध्यात्म्याला उत येतो. भजन, अभंग यांची जरा जास्तच वाजणी होत आहे असं झालंय. Zoom वर हनुमानचालीसा, रामरक्षा वगैरेची सामूहिक पारायणं होतात असं ऐकलय. विठोबासोबत पोटोबा आलेच. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती करून त्याचे सेवन करणे (आणि virtual share करणे) हेही चालतं.

हरिकथा भोजन परवडी विस्तार
करोनि प्रकार सेवो रुचे

पण हे सर्व करून देखील बराचसा फावला वेळ असतो जेव्हा self reflection चालतं. जेव्हा कधी हे सर्व संपेल आणि पुन्हा सुरळीत होईल तेव्हा त्या सुरळीला, normalcyला एक नवीन वळण मिळालं असेल. कामधंदा, शिक्षण, भविष्याची नियोजने इतकच नाही तर नातीगोती, इतरांशी बांधिलकी या सर्वातच खूप बदल असेल. ती adjustment कशी असेल या सर्वाचा विचार करता करता दिवस कसे जातायत कळतच नाही

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपलासी वाद आपणाशी

Friday, December 16, 2016

जैचई


कुठेतरी स्मिता पाटील जाऊन तीस वर्षे झाली हे पाहिलं आणि चटकन मला जैचईची आठवण झाली. १९८६ च्या त्याच डिसेंबर महिन्यांत ती सुद्धा आम्हाला सोडून गेली.
पुण्याला लहानपणी वाड्यात राहायचो तिथे आमच्या शेजारी एक जोशी कुटुंब होतं. माझे आजी-आजोबा यांच्या वयाचे पपा आणि जैचई आणि त्यांची चार मुले (साधारण माझ्या आईच्या वयाचे) जया, मीना, चारू आणि किरण/प्रमोद. जैचई म्हणजे थोडक्यात 'जयाची आई'. माझ्या आई-वडिलांचं शिक्षण तसं बेताचं, त्यात मराठी त्यांची मातृभाषा नसल्यामुळे नुसती ऐकून बोलायला शिकलेली. पण नशिबाने म्हणा किंवा योगायोग म्हणा माझ्यावर मराठीचे उत्तम संस्कार घडवणाऱ्या जोशी कुटुंबाचा मी आणि माझी बहीण एक अविभाज्य घटक झालो होतो. माझं त्या घरचं नाव 'पिल्लू' (आता नातवंडं सुद्धा पिल्लू काका म्हणतात, म्हणजे बेबी नंदा वगैरे तसं !). त्यांच्याकडच्या TV मुळे साप्ताहिकी फेम भक्ती बर्वे ते स्टार ट्रेकचा कॅप्ट्न कर्क आमच्या दृष्टीस पडले. तसेच पुलं, वपु, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांच्या कलाकृतीचा परिचय झाला. माझ्या वाचन-संगीताच्या छंदाचा पाया इथेच रुजला.
तर मी सांगत होतो जैचई बद्दल. उषा जोशी (आधीची बकुल रेगे) तिच्या नावासारखीच अगदी निरागस, भोळी, बालमनाची. एखादी गोष्ट हरवली कि 'टपूदेवी टपूदेवी अमुक तमुक पटकन सापडू दे' असं ती म्हणायची ते आता गमतीचे वाटते. आता कदाचित मी तिला आजी सारखी होती असं म्हणेन कारण आम्ही तिला संबोधायचो देखील एकेरीत. पण तेव्हा नकळत का होईना गुलजारचे शब्द आम्ही पाळत होतो 'प्यार को प्यारही रेहने दो, कोई नाम ना दो' . माझ्या बहिणीवर तिचा अधिक लळा. अगदी कुठलाही पदार्थ मागितला कि न कुरकुरता करून द्यायची. मग ते थालपीठ असो कि दाण्याचा लाडू. पोळी ऐवजी तिला भाकरी जास्त प्रिय. तसेच चॉकोलेट सुद्धा. फ्रीझ नव्हता तर बर्फ आणून दूध-कोको पावडर वापरून एकदा कॅडबरी केल्याचं ओझरतं आठवतं.
लाल मिरच्या-हळकुंड, भाजदाणीचं पीठ दळायला आम्ही आनंदाने तिच्यासोबत कुठल्यातरी ठराविक गिरणीत जायचो. रथसप्तमीला दूध उतवणे, वसुबारसला गायीला खायला देणे, तुळशीचे लग्न ह्या सगळ्यात ती आम्हाला सामील करून घ्यायची. मी ५-६ वर्षाचा असताना 'आपल्याकडे सुद्धा गणपती बसवायचा' असा हट्ट धरला आणि 'म्हणतोय तर बसव, मी सांगते काय काय करायचं ' असं माझ्या आईला धीर देत तिने सगळं रीतसर करवून घेतलं. दुर्वा निवडायला आणि दोरा न वापरता दुर्वेच्या पातीनेच जुडी बांधायला मी तिच्याकडूनच शिकलो. रामशास्त्री, रामराज्य, शेजारी असे जुने प्रभातचे चित्रपट लागले कि हमखास ती आम्हाला घेऊन जायची. अनंतचतुर्दशीला मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घ्यायला तीच आम्हाला लाकडीपुलापाशी घेऊन जायची.
साधारण ८३-८४ च्या सुमारास तिला पॅरालीसीसचा अटॅक आला. तिनं कुणाचं काय वाकडे केले होते मला अजून कळत नाही. घरच्यांनी, तिन्ही मुलीनी खुप छान सांभाळलं. पण शेवटी परावलंबत्व आल्यामुळे कधी कधी तिची चीडचीड व्हायची. स्वतः भाकरी थापणं आणि मुलींना सांगणं, शेवटी कुठेतरी जाणवणारच ना? २-३ वर्षे अशीच गेली. डिसेंबर ८६ ला मी दहावीत होतो. वर्गात एकदा निरोप आला कुणीतरी घ्यायला आलंय. आयुष्यात पहिल्यांदा कुणी जवळचं जाण्याचा प्रसंग. घरी येऊन तिचा देह पलंगावर पहिला आणि रडू आवरेना. आज लिहिताना सुद्धा तेच होतंय.
तीस वर्ष उलटली खरं वाटत नाही. आईच्या तोंडून कधी कधी आपसूक निघतं, जैचईने असं करायला शिकवलं. पॉपकॉर्न करताना तिच्यासोबत केलेल्या ज्वारीच्या लाह्या आठवतात. गणपतीला दुर्वा काढताना अजून जुडी बांधायला दोरा वापरत नाही. गणपतीला आवडेल कि नाही ते माहित नाही, पण वाटतं तिला आवडलं नसतं. मग दुर्वेच्या पातीनेच बांधलेली जुडी गणपतीला वाह्यली जाते.

सुरेश नायर 
१६ डिसेंबर, २०१६

Tuesday, December 24, 2013

नाट्यलेखन - एक प्रवास, एक अनुभव

लहानपणी पोहायला शिकलो नाही पण पाण्याची भयंकर आवड म्हणून पोहायला शिकायचे. संगीताची आवड पण  कधी गाणं शिकलो नाही म्हणून गायला शिकायचे. आणि वाचनाची भारी आवड तेव्हा आपणही कधी लेखक व्हायचे. विशीचा उंबरठा ओलांडायच्या आधी या तीन इच्छांनी माझ्या मनात घर केले होते.

वयाच्या चोविशित पुण्याच्या टिळक तलावात, क्लास लावून, एकदाचा पोहायला शिकलो. फार विशेष नाही, पण समुद्रात प्रवास करताना बोट बुडालीच तर तास दोन तास का होईना तरून जाईन इतकं बेताचं. इथे आल्यानंतर हौसेने मंडळाच्या कोजागिरीच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि जाणवलं कि सुरांशी आणि तबल्याच्या ठेक्याशी आपली शिवणापाणी किंवा  कबड्डी चालते. मग तिशीत शिस्तीत क्लास लावून गायनाचे धडे घेतले आणि स्वतःही मेहनत घेतली. आता मैफिल रंगविण्याची क्षमता नसली तरी मैफिलीत योग्य तिथेच दाद देण्याची अक्कल आली आहे (आणि काहींच्या delayed 'वा क्या बात है' वर मनात हसूही येतं). स्वतः लिहिलेल्या कविता व गीतांना कधी कधी चालीही बऱ्यापैकी जमून येतात.

लेखन ही कला मात्र काही कुठे धडे घेऊन शिकता येतेच असे नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात . एक म्हणजे भाषेची आवड आणि जाण. साधी गोष्ट सुद्धा अलंकार, उपमांचा वगैरे वापरून सुंदर शब्दात साकार करता आली पाहिजे. "मी नव्यानेच अमुक तमुक सुरु केलंय. मला यात खूप प्राविण्य आणि यश मिळवायचं आहे" हेच या शब्दात लिहिता येतं "मी क्षितिजाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मला तो उंबरठा ओलांडायचाय, त्या क्षितिजाचा वेध घ्यायचाय, त्याची सीमा गाठायची आहे." दुसरी गोष्ट म्हणजे निरीक्षण आणि स्मरणशक्ती. ऐकलेली, वाचलेली, पाहिलेली, दिसलेली गोष्ट कुठेतरी मनात सोनं, माणके, हिरे असल्यासारखी साचवून ठेवायची (safe deposit असल्यासारखं). मग हवी तेव्हा, हव्या त्या संदर्भात, हवी ती गोष्ट काढायची आणि योग्य ती कलाकुसर करून, आपल्या कोंदणात बसवून एखादी कथा, कविता, लेख, कादंबरी, नाटक सादर करायचं.

अर्थात मी जे वर सांगितलं त्या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ एका लेखकाची अवजारं आहेत, tools of the trade, techniques of writing, हवं तर ‘craftsmanship’ असं म्हणा. एखाद्या सुताराला किंवा शिल्पकाराला कुठलं अवजार कधी आणि कसं वापरावं हे जसं पक्कं ठाऊक असतं, तसंच काहीसं. पण नुसतं तेवढं असून भागत नाही. तुम्ही खतपाणी घालू शकता पण झाड उगवायला एक बीज असावं लागतं आणि त्या सुताराला किंवा शिल्पकाराला त्याची कलाकुसर दाखवायला उत्तम प्रकारचं लाकूड नाहीतर खडक शोधावा लागतो. तसंच एका लेखकाला एक सुंदर विषय, कथेचं एक मूळ, नाटकाचा एक प्लॉट सापडावा लागतो ज्यावर तो त्याच्या लेखनशैलीची, कलाकुसरीची करामत दाखवू शकतो. आणि इथे बऱ्याच जणांची विकेट पडते, ब्याटिंग करण्याआधीच.

कशावर लिहावं हा कुठल्याही लेखकाला पडणारा मूळ प्रश्न. एखादा विषय सुचला कि त्यावर लिहिलेलं, पाहिलेलं  दुसरं काहीतरी आठवतं आणि मग विचार येतो परत ते कशाला. हे चक्र माझ्या मनातही अनेक वर्ष सुरु आहे. कविता सुचते ती आपसूक. एखादा शब्द, वाक्य, विचार मनात येतो मग त्यावर तुम्ही विस्तार करू शकता. पण गोष्ट - कथा सांगणं वेगळं कारण नुसतं वाचनाद्वारेच नव्हे तर नाटक, सिनेमा, टिव्ही या माध्यमातून सुद्धा  आपल्यावर सतत त्याचा भडीमार होत असतो.  मग मला Christopher Booker यांचं The Seven Basic Plots या पुस्तकाचा संदर्भ सापडला. पूर्ण वाचलं नाही पण आशय कळला. माझ्या शब्दात सांगायचं तर "जगात फक्त सात मूळ कथा आहेत. कुठलीही कथा, कादंबरी, नाटक वगैरे त्या मूळ सात कथानकात मोडतात. They are just the variations of the same basic stories. उदारणार्थ नायक आणि नायिकेची प्रेमकथा, त्यांच्यात येणारे अडथळे आणि शेवटी एकत्र येणे किंवा न येणे. किंवा नायक - नायिकेचा अन्यायावर , अन्याय करणाऱ्यांवर विजय. रामायण, महाभारत अश्या मोठमोठ्या कलाकृती असोत नाहीतर लहान मुलांच्या पंचतंत्रातल्या गोष्टी. सर्व काही फक्त या सात मूळ कथानकमध्ये मोडता येतात."  

माझ्यासाठी हा एक साक्षात्कार होता. पाहायला गेलो तर 'रोमियो-जुलीयट’ ही प्रेमकथा, 'लैला-मजनू' ही प्रेमकथा, 'अर्जुन-सुभद्रा' ची प्रेमकथाच आणि ‘शाकुंतल’ ही सुद्धा प्रेमकथा. पण शेक्सपियर, कालिदास, व्यास किंवा इतर अनेक लेखक असोत त्यांनी आपापल्या प्रकारे त्या कथा रंगवल्या. पात्र, प्रसंग, लेखनशैली प्रत्येकाची वेगळी आणि त्यामुळे ती प्रत्येक कथा आपल्याला वेगळी भासते, आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. So it’s the writer’s interpretation that matters the most. एक उदाहरण म्हणजे Bernard Shaw यांचं 'Pygmalion' आणि पुलंचं 'ती फुलराणी' हे नाटक. एकावर आधारित दुसरी कलाकृती. पात्रं तीच, प्रसंग बरेचसे तेच पण माझ्यादृष्टीने या दोन भक्कमपणे स्वतंत्र उभ्या राहू शकतील अश्या कलाकृती. लंडन मध्ये फुले विकणारी Eliza Doolittle असेलही पण म्हणून मुंबईत फुले विकणारी एखादी ‘मंजुळा’ नसेल कशावरून? तसंच एक अलीकडचं उदाहरण म्हणजे Yann Martel यांचं Life of Pi आणि Moacyr Scliar या ब्राझीलच्या लेखकाचं Max and the Cats पुस्तक. एकसारखी कल्पना घेऊन दोन वेगळे लेखक स्वतःच्या पद्धतीने आणि विचाराने त्यावर विस्ताराने लेखन कसं करू शकतात याची उत्तम साक्ष.

एकदा का मनाची ही अढी दूर झाली कि कुठल्याही लेखकाला कशावर लिहावं या प्रश्नावर अडायचं कारण नाही. त्यानं कशावरही लिहावं.  तुम्ही तुमच्या पद्धतीने, शैलीने, आणि कल्पनांच्या जोरावर ते लिहिलं कि झालं. माझ्या पहिल्या नाटकाचा विषय मला एका science journal मध्ये वाचलेल्या लेखात सुचला. पण त्यातून निर्माण झालं ते एक हलकं-फुलकं, काहीसं विनोदी, काहीसं मनाला स्पर्श करणारं, नृत्य- गीताने सजलेलं असं नाटक ‘वारा लबाड आहे’. तीन पिढ्यातील स्त्री-पुरुषातल्या मनाची उकल करणारं हे नाटक सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. 'नाट्यचक्र'  या या दुसऱ्या नाटकाचा विषय मात्र मला एका इंग्रजी नाटकातच मिळाला. तसं करणं योग्य आहे कि नाही या विचारात मी काही काळ अडकलो. आणि तेव्हाच वरचे काही विचार माझ्या मनात डोकावले. ते बरेचसे विचार मग मी त्या नाटकात 'प्रभाकर नाडकर्णी' या काल्पनिक नाटककाराच्या तोंडी घातले. याही नाटकाने प्रेक्षकांची परीक्षा उत्तमरीत्या पास केली. विशेषत: भाषेचा उत्तम वापर, समर्पक संवाद, वेधक कथानक आणि पात्रांचा व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा अभिनय हे सगळं रसिकांची दाद मिळवून गेलं. 

या लेखनप्रवासाची सुरुवात, हा अनुभव, आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आनंददायक आहे आणि प्रयत्न केला तर आपण असंच आणखी चांगलं लिहू शकतो हा आत्मविश्वास वाढवणारा आहे. लेखक व्हावं ही इच्छा पूर्ण झाली असं म्हणणं अतिशययोक्ती ठरेल कारण अजून व्यावसायिकरित्या छापून काहीच आलेलं नाही. कदाचित पन्नाशी यायच्या आधी योग येईलसुद्धा. मात्र या हौशी अश्याच सुरु असताना, आता पुढच्या दोन तीन दशकात काय शिकायचं, काय नवीन उद्योग करायचे ते ठरवायला हवं!   

सुरेश नायर
(नोव्हेंबर, २०१३)





    

New England Trip - Summer 2023

Links to all photos and videos from the trip  https://photos.app.goo.gl/XqbL45Cf6DTUyyLq5 Planning I asked my son Malhar where he wanted to ...